रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

सेंद्रिय शेतीचे आहेत याचा अवलंब केल्याने रासायनिक खते किटकनाशके व तणनाशके इत्‍यादिंचा वापर कमी करून अन्‍नधान्‍याचा दर्जा वाढविण्यास मदत होते. याबरोबरच उत्पादन खर्चही कमी होतो. महाराष्ट्रात काही प्रगतशील शेतकरी सेंद्रीय शेतीचा अवलंब करू लागले आहेत. राज्‍यात सेंद्रीय शेतीला उत्‍तेजन देणा-या दोन योजना राबविण्‍यात येत आहेत. त्‍यापैकी पहिली योजना 150 % राज्‍यपुरस्‍कृत असुन ती वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन अभियानातंर्गत राबविली जात आहे. सेंद्रिय शेती केल्याने काय फायदे होतात? हे जाणून घेऊया.;

नत्र पुरवठा :

  • जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थेत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात.
  • शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कॊंबडीची विष्ठा ) रेशिम उद्योगातील टाकावू पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते :

  • ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ जमिनीला दिल्यास पाणी धरुन ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.
  • [एक एकरात ८ टन शेणखत (कुजलेले) घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.]
  • जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो.जमिनीची धुप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहिसे होत जातात.वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढते व पाणी धरुन ठेवण्याची क्षमताही वाढते.

स्फुरद व पालाश :

  • सेंद्रिय खतंमुळे स्फुरद व पालाश झाडांना विविध अवस्थेत उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांच्याद्वारे शोषली जातात.

जमिनीचा सामू :

  • सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमिन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.

कँशन एक्स्चेंज कॅपॅसिटी (CEC) :

  • कँशन एक्सचेंज कँपोसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती.
  • सेंद्रिय खतांमुळे कँशन अँक्शचेंज कँपोसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलीत पोषकद्रव्ये मिळतात.

कर्बाचा पुरवठा :

  • कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.

सेंद्रिय खतांचा परिणाम :

  • सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात.उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमिन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.
  • सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.त्यात रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात .अशा वेळी ट्रायकोडरमा नावाचे जीवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणा-या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.
  • अब आपको मिलेगी :
    कॅश ऑन डिलिव्हरी Amazone पर ईस No:-8956871244 को सर्च करके

    आपका दोस्त:-9767981244

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

संपूर्ण जगात आता सेंद्रिय पध्तीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला औषधी वन्सपती, सेंद्रिय दूध आदि खादय पदार्थांना चांगली मागणी आहे. कारण रासायनिक खते, किटक नाशके व अन्य औषधे यांचा अति वापर केल्याने निर्माण झालेला शेतमाल, दुध इत्यादी यामध्येही रसायनांचा शिरकारव होतो व तो शेतमाल, फळे दिसण्यास आकर्षक असला तरी प्रकृतीस हानीकारक ठरतो हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे. तसेच या रसायनांचा वापर शेतजमीन, पाणी, हवा परिसर यांनाही खराब करतो. प्रदूषणांच्या या दोषांमुळे रसायनाचा वापर नसलेलाच शेतमाल व दुध वापरावे असा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांनीसुध्दा यात लक्ष घातले आहे.
भारत सरकारनेही याविषयी शेतकरी, व्यापारी यांना साहयकारी ठरेल अशा उपाययोजना सुरु केल्या आहेत. कारण भारताला या क्षेत्रात मोठा वाव आहे मात्र युरोप, अमेरिका आदि प्रगत देशांतून प्रचंड मागणी असली तरी तेथील तपासणी ही कडक आहे. सेंद्रिय पदार्थांचे परिक्षण करणे व त्यांना तसे प्रमाणपत्र मिळवून देणे, त्यांचे वर्गीकरण, निरीक्षण करणे याची काही कार्यपध्दती व मागणी
निश्चित केली आहेत.
येथे "सेंद्रिय" म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतात मोठया प्रमाणात शेती परंपरागत पध्दतीने केली जाते. पण परंपरागत सेंद्रिय नव्हे. संपूर्ण सेंद्रिय शेतमाल असण्यासाठी प्रारंभापासून लक्ष घालणे व संबंधित शेती विभाग, कृषी विदयापीठे संस्था यांचे निरिक्षण व मदत घेणे प्रमाणपत्रासाठी आवश्यक असते.
वरती ज्यांचा उल्लेख केला आहे त्या युनोच्या जागतिक आरोग्य संघटना व जागतिक अन्न व शेती संघटना यांचे "कोडेकस ॲलीमेंअरीयस कमीशन" या संस्थेने सेंद्रिय शेतीची व्याख्या केली आहे ती अशा :- सेंद्रिय शेती म्हणजे अशी उत्पादन पध्दती जी कृत्रिमरित्या  वेगवेगळया पदार्थांचे मिश्रण करुन केलेली खते, किटकनाशके, वाढीचे नियमन करणाऱ्या औषधांचा तसेच जनावरांच्या खादयात औषधांचा  वापर करत नाही अशा शेतीची पध्दत. सेंद्रिय शेतीमध्ये पिके आळीपाळीने घेणे, पिकांचे अवशेष, शेण खते, हिरवी खते, द्विदल धान्ये, शेती बाहय पण सेंद्रिय कचरा यांचा वापर केला जातो. जमीनीची उत्पादकता टिकविली जाते, खोल नांगरणी केली जाते पोषणासोबत किटक व अळी नियंत्रणासाठी सजीव किटक नियंत्रण पध्दतींचाच वापर केला जातो.
सेंद्रिय शेतीचा प्रारंभ तळापासून होतो. मातीची व जमीनीचा उपयोग पर्यावरण रक्षणाच्या व सामजिक जबाबदारीच्या जाणिवेने केला जातो. त्यांची पुनरुत्पादनक्षमता सेंद्रिय पध्दतीनेच वाढविता येते. त्यासाठी मातीचे व्यवस्थापन केले जाते. रोपांचे योग्य पोषण केले जाते व त्यातून रोग प्रतिकारक शक्ती असलेली शेती उत्पादने तयार होतात.
भारतात सेंद्रिय शेतीला खूप वाव आहे. येथील वेगवेगळया प्रकारच्या हवामानामुळे सर्व प्रकारची सेंद्रिय उत्पादने घेता येणे शक्य आहे. तसेच पूर्वापार शेतीची पध्दत सेंद्रियच राहिली आहे. त्यामुळे घरगुती व निर्यात बाजारपेठेतून मोठया प्रमाणात फायदा घेता येईल. जगात सेंद्रिय  शेती करणाऱ्या मोठया देशांच्या क्रमवारीत भारत दहाव्या स्थानावर आहे. एकूण शेतजमिनीपैकी 10 टक्के जमिनी सेंद्रिय शेतीसाठी उपलब्ध आहे. 0.50 दशलक्ष हेक्टर जमीन लागवड योग्य आहे. उर्वरित 90 टक्के (4.71 दशलक्ष हेक्टर) जमिनीवर वने आहेत. त्यातून किरकोळ वन उत्पादने मिळू शकतात. वर्ष 2012-13 मध्ये एकूण 5.21 दशलक्ष हेक्टर जमिनीचा सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणिकरण  करण्यात आले होते. भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादने म्हणजे ऊस, कापूस, बासमती तांदूळ, मसाले, डाळी, चहा, कॉफी, तेलबिया फळे व त्यांचे मूल्यवर्धित  उत्पादने ही आहेत. एकूण 1.34 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन होते. सर्वात जास्त सेंद्रिय शेती उत्पादने मध्यप्रदेश या राज्यात होतात. त्यानंतर राजस्थान व उत्तर प्रदेश यांचा नंबर लागतो.
दुभत्‍या पशुंची सेंद्रिय पध्दतीने निगा
सेंद्रिय पध्दतीने पशूपालन केलेल्या दुभत्या  जनावरांच्या म्हणजे गायी, म्हशी, बकऱ्या आदिंचे दुध व त्याचे पदार्थ यांनाही मागणी आहे. यासाठीही काही मानके ठरवून दिली आहे व तसे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांना अधिस्वीकृती देण्यात आली आहेत. त्यांचे प्रमाणपत्र या दुधाच्या व्यापारास आवश्यक असते. सेंद्रिय  दुधाची व्याख्याही करण्यात आली आहे ती अशी "ज्या सस्तन पशूंच्या आहारात कोणत्याही कृत्रिम खतांच्या साहयाने तयार केलेले खादय नसते, त्यांच्या दुधास "सेंद्रिय दुध" म्हटले जाते. म्हणून या पशूंची वाढ व संवर्धन करतांना त्यांचे खादय फक्त सेंद्रिय पध्दतीने तयार केले आहे की नाही याकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच त्यांना नैसर्गिक वातावरणातच ठेवावे लागते. त्यांना अँटीबायोटिक्स, रासायनिक औषधे दिली जात नाहीत. त्यांना आजार झाल्यास  त्याचे नियंत्रण आहारातूनच केले जाते. रोग होऊच नये याची काळजी घेतली जाते. त्यांना चरायला नेणे, समतोल आहार देणे, निरोगी जागेत ठेवणे व कुठलाही ताण पडणार नाही याकडे लक्ष दिले जाते. त्यांचा जन्म व संगोपनही सेंद्रिय शेतीमध्ये झालेले असावा. तसे ज्या प्रजाती स्थानिक वातावरणाशी अनुरुप असतील त्याच फक्त वाढविल्या जातात. जन्म नैसर्गिक असावा, गर्भाशय बदलाचे तंत्र वापरण्यास परवानगी नसते, हार्मोनल हिट ट्रिटमेंट, कृत्रिम गर्भधारणा, जीएमओ तंत्रज्ञान यांना बंदी असते. त्यांचे खादय 100 टक्के सेंद्रिय असावे लागते.  ॲलेपॅथिक औषधे, रॉनिक्स, भूख वाढविणारी औषधे, प्रतिजैविके देण्यास मनाई असते. तसेच या दुभत्या पशूंना पिंजऱ्यात कोंडून ठेवता येत नाही. अशा अनेक अटी आहेत.
सेंद्रिय दुधाचे महत्त्व
सेंद्रिय दुधात व्हिटॅमीन ए व इ ही जीवनसत्वे जास्‍त असतात. मानवी शरीरात होणाऱ्या आजारात हे दुध प्रभावी ठरते. त्यात फॅटी ॲसीडस असतात. हृदय विकास, संधिवात आदि आजारांना दूर ठेवण्याकरिता सेंद्रिय दुध उपयुक्त ठरते.
सेंद्रिय नसलेल्या दुधात अनेक केमिकल्स असू शकतात. त्यामुळे ते दुध पिणाऱ्यांना काही आजार होऊ शकात. सेंद्रिय दूधाचे उत्पादन हे स्वस्त असते.
सेंद्रिय उत्पानांचे प्रमाणिकरण केवळ आहारात नव्हे तर सौंदर्य प्रसाधने, आरोग्य, फॅशन कपडे क्षेत्रातही सेंद्रिय उत्पादनांना मागणी आहे. युरोप-अमेरिकेत यासाठी मुद्दाम प्रचार केला जातो. यासाठी भारत सरकारच्या वाणिज्य व उदयोग मंत्रालयाने "नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑगॅनिक प्रोडक्टस" 2000 मध्ये सुरु केला.  परदेशी व्यापार व विकास कायदयांतर्गत त्याची अधिसूचना काढण्यात आली. सेंद्रिय मालाचे प्रमाणिकीकरण  करण्यासाठी मानके, निकष तयार करणे त्याची कार्यपध्दती ठरविणे, प्रमाणपत्रे देणाऱ्या संस्थांना मान्यता देणे व प्रमाणपत्र मिळालेल्या पदार्थांच्या  वेष्टनावर "राष्ट्रीय सेंद्रिय मानचिन्ह" वापरण्यास परवानगी देणे आदिंचा समावेश या कार्यक्रमात आहे. यासाठी वाणिज्य मंत्रालय ही शिखर संस्था आहे. ही कार्य पध्दती आंतरराष्ट्रीय दर्जाशी सुसंगत असल्याबद्दल युरोपीय राष्ट्रांनी 2006 मध्ये मान्यता दिली आहे.
वाणिज्य मंत्रालयातर्गत एपीईडीए अर्थात "कृषि प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण" ही संस्था कार्यरत आहे. त्यांनी अकरा संस्थांना प्रमाणपत्रे देण्याचे अधिकार प्रदान केले. प्रमाणित उत्पादनांना "लोगो" लावल्यास परवानगी मिळते. त्यामुळे ही उत्पादने सहज ओळखता येतात. त्याची किंमत चांगली मिळते.  यामुळे छोटया  शेतकऱ्यालाही निर्यात करता येते.
नेटवर पुस्तिका उपलबध :-  केंद्र सरकारच्या कृषि मंत्रालयाने माहिती देणारी एक पुस्तिका  प्रकाशित केली आहे. "सर्टिफिकेशन अँड इन्स्पेक्शन ऑफ ऑर्गनिक फार्मिंग" असे या पुस्तिकेचे नाव असून ती डॉ. ए. के. यादव या शास्त्रज्ञांनी लिहिली आहे. ही पुस्तिका कृषि व सहकार विभागाची वेबसाईट www.dacnet.nic.in/nocf येथे उपलब्ध आहे. जमीन लागवड वापर अहवाल ठेवणे, जागेची तपासणी, सर्व बाबींचा सखोल अभ्यास, कागदपत्रे, योजना, अनूयापालन, निरिक्षण, कसे करावे आदि माहिती यामध्ये दिलेली आहे. ऑर्गनिक उत्पादने "नॅशनल सेंटर ऑफ ऑगँनिक फार्मिंग, सी-90-11- कमला नेहरु नगर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश  201002 या पत्यावर संपर्क साधावा.
सेंद्रिय शेती संबंधात युरोपियन देशात तसेच जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व चीन येथे कायदे केले आहेत. तेथील सेंद्रिय उत्पादनांवर तसेच "चिन्ह" त्यामुळे लावता येते. भारतात सुध्दा आता तसे चिन्ह दिले आहे. ते या वेबसाईटवर दिले आहे. त्याचा वापर उत्पादकांना करता येईल त्यामुळे बाजारात, मॉल येथे ही उत्पादने ग्राहकांना पटकन ओळखता येतील.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (ॲसोचेम) या संस्थेच्या वेबसाईटवर सुध्दा याबद्दल माहिती आहे.
अलिकडेच "इंडियन काँपीटन्स सेंटर फॉर ऑगॅनिक ॲग्रीकल्चर (आयसीसीओए) हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे. ते सेंद्रिय शेतीचा प्रसार करणे, माहिती देणे, कागदपत्रे तयार करणे इ. कामे करील.
महाराष्ट्र राज्यात "महाराष्ट्र ऑर्गनिक फर्मिंग फेडरेशन (एमओएफएफ) ही संस्था प्रमाणपत्रे देणे व इतर कामे करते.
      भारतातील सेंद्रिय कृषी उत्पादनांचा दर्जा व मानके आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या देशातील मानकांच्या समकक्ष असल्याची मान्यता युरोप व स्वितर्झंलड यांनी दिली आहे.
      भारतातील काही मंत्रालयाच्या सहकार्याने आणखी काही संस्था सेंद्रिय उत्पादनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कृषि मंत्रालयातर्गत "राष्ट्रीय जैविक खेती परियोजना किवा नॅशनल सेंटर ऑफ ऑर्गनिक फार्मिंग ही संस्था देशभरात अनेक उपक्रम करते. या संस्थेची देशात सहा प्रादेशिक कार्यालये असून त्यातील एक महाराष्ट्रात नागपूर येथे आहे. अन्य कार्यालये, बंगलोर, भुवनेश्वर, हिस्सार, इम्फाळ व जबलपूर येथे आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिरे, प्रकाशने इ. उपक्रम हाती घेतले जातात.
महाराष्ट्र ऑर्गनिक फार्मिग फेडरेशन (एमओएफएफ)
      महाराष्ट्रातील या संस्थेचे काम मोठया प्रमाणात चालू आहे. या संस्थेने महाराष्ट्रात मोठया प्रमाणावरील म्हणजे कापूस, तांदूळ, लाल चणे, ऊस व गहू यांचे सेंद्रिय उत्पादन कसे घ्यावे याविषयी एक पुस्तक प्रकाशित केली आहे. www.moffindia.com या संस्थेची वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच संस्था प्रशिक्षण शिबिरे घेते. महिला शेतकऱ्यांसाठी  वेगळी शिबिरे, परिक्षा, प्रकल्प शेतीच्या भेटी-सहली आदि उपक्रम चालतात. आता या सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून "फॉमर्स प्रोडयूसर्स कंपनी" सुध्दा काढली आहे. संस्थेचे सेंद्रिय बियाणे मिळविणे, लागवड, पोषण, सेंद्रिय खते व किटकनाशके असे सर्वंकष प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह दिले जाते. संस्थेचा पत्ता 103 ए/11 बालाजी निवास, प्लॅट नं. 5, कॉस्मॉस बँक लेन, दिप बंगला चौक, मॉडेल कॉलनी, पुणे  411016 आहे. (फोन 91-2025659090)
      राज्यातील 1,42,000 शेतकरी व अन्य संबंधित व्यक्ती या संस्थेच्या सदस्य आहेत. "शाश्वत" नावाचे मासिकही काढले जाते.
 

बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

सिक्किमनेे देशातले पहिले सेंद्रिय राज्य होण्याचा मिळवला आहे. सिक्किमच्या खालोखाल केरळनेसुध्दा सेंद्रिय शेतीला आपल्या राज्यामध्ये मोठा बढावा दिलेला आहे. कारण या दोन राज्यातल्या कृषीतज्ञांना आणि विशेषतः शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात आले आहे. आज देशातले पहिले सेंद्रिय राज्य म्हणून सिक्किमला मान दिला जात आहे आणि त्यानिमित्ताने तिथे सेंद्रिय शेती परिषद होत आहे. तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. सिक्किममधील ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती सुरू करण्यात आली आहे. शेती या विषयाची माहिती असणार्‍या आणि नसणार्‍या त्याचबरोबर शेतीशी काही संबंध नसणार्‍या अशा अनेक लोकांना सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणजे नेमके काय याचा बोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण मुळात सेंद्रिय शेती म्हणजे काय याची जाणीव सामान्य लोकांत तर सोडाच पण शेतकर्‍यांमध्येसुध्दा राहिलेली नाही. त्यामुळे आधी सेंद्रिय शेती हा काय प्रकार आहे हे समजून घ्यावे लागेल. थोड्या ढोबळमानाने सांगायचे झाल्यास असं सांगता येईल की, सध्या शेतीमध्ये ताबडतोब होणारी उत्पादनवाढ पदरात पाडून घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
पिकांवर पडलेल्या रोगांचा, किडींचा आणि बुरशींचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक खते आणि विषारी औषधे मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. यांच्या वापरामुळे शेतीचे तंत्र फार बदलून गेले आहे आणि आपली शेती ही रासायनिक झाली आहे. या रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर एवढा सर्वंकष झाला आहे की शेती म्हटली म्हणजे त्यांचा वापर होणे अटळ आहे असाच लोकांचा समज झाला आहे. खरे म्हणजे रासायनिक खतांचा शोध अलीकडच्या ७०-८० वर्षातला आहे. भारतात तर त्यांचा वापर गेल्या ४० वर्षांत वाढला आहे. मग त्याच्या पूर्वी भारतात शेती नव्हतीच का? शेतीची परंपरा १० हजार वर्षांची आहे. म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करताही शेती होऊ शकते. किंबहुना ती तशी १० हजार वर्षांपासून होत आलेली आहे आणि ती शेती रसायनांचा वापर न करता केली जात होती. ती जी बिगर रासायनिक शेती आहे तिलाच सेंद्रिय शेती असे म्हटले जाते. सेंद्रिय शेतीमध्ये शेती उत्पादन काढण्याकरिता रसायनांचा वापर न करता निसर्गातून उपलब्ध झालेल्या सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. आपण परंपरेने तसा तो करत आलेलो आहोत आणि खत म्हणून शेणाचा, मलमूत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आलेलो आहोत. पुन्हा एकदा त्याच जैविक साधनांचा वापर करून शेती करणे म्हणजे सेंद्रिय शेती होय.
सिक्किममध्ये राज्य सरकारने रासायनिक खताला बंदी घालून आणि सेंद्रिय पदार्थाच्या वापराला प्रोत्साहन देऊन आपली परंपरागत सेंद्रिय शेती वाढवली आहे आणि पूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य असा लौकिक मिळवला आहे. सेंद्रिय शेतीची गरज का आहे हे आधी पाहिले पाहिजे. या गरजेचे पहिले कारण आहे आर्थिक आणि दुसरे आहे ते आरोग्याचे. रासायनिक खतांच्या वापराने शेतातल्या गांडुळांची संख्या कमी होते. गांडूळ हा शेतकर्‍यांचा मित्र असतो असे परंपरेने सांगितले जाते मात्र त्याकडे मधल्या काळात दुर्लक्ष झाले. परंतु गांडूळ शेतकर्‍यांचा मित्र असतो. या म्हणण्यात फार मोठा आशय सामावलेला आहे. गांडूळ शेतातली माती भुसभुशीत करतो आणि शेत नांगरण्याचे खर्च वाचवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जमीन भुसभुशीत केली की पिकांच्या मुळांची मातीत होणारी हालचाल सोपी जाते आणि मुळे सहजतेने जमिनीत खोलवर जाऊन अन्न आणि पाणी शोषून घेतात. मुळे जेव्हा असे अन्नपाण्याचे शोषण करतात तेव्हा पिकांची वाढ चांगली होते. म्हणजे गांडूळामुळे पिक चांगले येते.
गांडूळांना डोळे नसल्यामुळे ते स्पर्श होईल ते खात राहतात आणि खातात खाता मातीच्या आतील रोगजंतूंचाही फडशा पाडतात. त्यामुळे पिकांवर रोग कमी पडतात आणि महागडी औषधे आणून फवारण्याची गरज लागत नाही. म्हणजे गांडूळामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाचतो. सेंद्रिय शेतीतला गांडूळ हा महत्त्वाचा घटक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संेंद्रिय खते तयार करताना शेतातल्या काडीकचर्‍याचा वापर केला जातो. तो काडीकचरा एरवी वाया जात असतो. परंतु त्यांचाच खत म्हणून वापर केल्यास रासायनिक खते विकत आणण्याची गरज भासत नाही आणि शेतकर्‍यांचे पैसे वाचतात. गांडूळाच्या पोटात एक विशिष्ट प्रकारची भट्टी आहे. त्या भट्टीतून त्याने खाल्लेल्या मातीत नत्र मिसळले जाते. म्हणजे गांडूळ हा युरियाचा पुरवठा करणारा फुकटचा कारखानदारसुध्दा असतो. त्यातूनही शेतकर्‍यांचे पैसे वाचतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक शेतीमध्ये वापरली जाणारी रसायने पिकांच्या शरीरात आणि धान्यामध्ये मिसळली जातात आणि आपण ते धान्य खातो तेव्हा ती शोषली गेलेली विषारी द्रव्ये धान्यांच्या माध्यमातून आपल्या पोटात जातात आणि त्यांचे आपल्या शरीरावर मोठे विपरित परिणाम होतात. त्यातून अनेक प्रकारची रोगराई पसरते. अलीकडच्या काळात ते परिणाम लक्षात यायला लागले आहेत आणि म्हणूनच रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतल्या मालाला लोकांची मागणी यायला लागली आहे. कारण सेंद्रिय शेतीतली उत्पादने विषमुक्त असतात. हे लोकांच्या लक्षात आले आहे. याही दृष्टीने सेंद्रिय शेती आपल्या हिताची ठरणार आहे. आज सिक्किम हे राज्य सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले आहे. हळूहळू देशाच्या अन्य राज्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार झाला पाहिजे.

वातावरणावर होणारा दुष्परिणाम
भाग ३
कालच्या भागात आपण कीटकनाशकाचा घातक प्रभाव पहिला आजच्या भागात वातावरणावर होणारे त्याचे दुष्परिणाम पाहू.
रासायनिक कीटकनाशकामुळे जमीन पाणी हवा हे बाधित होतात.
तसेच पशू, पक्षी, मासे, फायदेशीर कीटक व आजूबाजूची पोषक वनस्पती सुद्धा मारली जातात. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी कमी होत जाते व एक दिवस जमीन नापीक होण्याचा धोका उद्भवतो
नद्या,पान आणि भुजलावर होणारा परिणाम
कीटकनाशके व रसायने फवारणी केलेल्या पिकांना ज्यावेळेस पाणी दिले जाते ते रसायन, कीटकनाशक युक्त पाणी माती जमिनीमध्ये झिरपले जाते, तसेच वाहत जाणारे पाणी, तळामधे व नद्यामधे मिसळते त्यामुळे तळे, नद्या,व भूजल मधील पाणी दूषित होत चालले आहे.
यू. एस. जी. एस.(युनायटेड स्टेट झ्युअालॉजीकल सर्वे)
१९९० मधे USGS च्या सर्वेक्षणानुसार हाती आलेल्या रिपोर्ट मधे असे आढळून आले की,जवळपास देशातील ९०%नदीपात्र रसायनाने व कीटकनाशकाने बाधित आहेत. त्यामुळे जलचरप्रान्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना दिसत आहे. पुढे लुप्त होण्याचा धोका देखील आहे. त्याचाच परिणाम असंख्य जलचर प्राण्याच्या जाती नश्ट झाल्या आहेत.

मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

आर्गनिक सब्जीभाजी.
आजच आपल्या Facebook ग्रुप ला भेट द्या
https://www.facebook.com/groups/1987014478220273/

अब आपको मिलेगी :
कॅश ऑन डिलिव्हरी Amazone पर ईस No:-8956871244 को सर्च करके

आपका दोस्त:-9767981244

१) किसान भाई का नाम मछिन्द्र बलिराम शिंदे ग्राम आसुर्णे तहसील इंदापुर जिला पुणे, किसान भाई आर्गनिक सब्जी भाजी लगाते हैं, कंपनी के प्रतिनिधि महेंद्र जे. शेंडे सर ने मल्टीप्लायर की मदत से आर्गनिक सब्जी की तकनीक बताई.

२) किसान भाई की सब्जी वालचंदनगर तथा आसुर्णे बाजार में बिक जाती है, उनका माल बाजार में सबसे पहले बिकता है, भाव भी ज्यादा मिलता है.

३) किसान भाई की प्रसिद्धि धीरे-धीरे बढ़ी, जैसे-जैसे लोगों को सब्जी में अधिक स्वाद का पता चलता गया, उनके ग्राहकों की संख्या बढ़ती गई.

४) आप जिन फसलों के फोटो देख रहे हैं, इनमें मेथी,सुआ (शेपू) कोथंबीर इत्यादि हैं.

५) किसान भाई ना तो रासायनिक खाद डालते हैं ना रासायनिक दवाइयों का छिड़काव करते हैं.

६) बस ४ से ५ बार मल्टीप्लायर का छिड़काव करते हैं, सब्जी तैयार हो जाती है, खर्च कम से कम है, उत्पादन बढ़कर मिल रहा है, भाव भी अच्छा मिलता है.
आपका दोस्त:-9767981244


शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

Tomato, टमाटर.
. joined this group
.https://www.facebook.com/groups/1987014478220273/

अब आपको मिलेगी :
कॅश ऑन डिलिव्हरी Amazone पर ईस No:-8956871244 को सर्च करके

आपका दोस्त:-9767981244
टमाटर की फसल का मल्टीप्लायर के साथ नियोजन.

टमाटर की फसल में टनेज बहुत ज़्यादा निकलता है ,इसीलिए उसे खाद भी ज़्यादा लगेगा जब तक उत्पादन लेना है, हर महीने एक किलो मल्टीप्लायर ज़मीन से देना है, मल्टीप्लायर जमीन से देने का तरीका अलग से बताया गया है.

छिड़काव से फसल पर ज्यादा अच्छा और तुरंत परिणाम मिलता है, इसलिए जमीन से देने के साथ-साथ प्रति सप्ताह १५ लीटर पानी में १५ ग्राम मल्टीप्लायर + २ मिली ऑल क्लियर मिलाकर छिड़काव करें, आवश्यकतानुसार किटक नाशक, फफूंद नाशक भी मिला सकते हैं.

रासायनिक खाद एकदम से बंद नहीं करना है, उसका प्रमाण २० प्रतिसत कम करिये, जब आपको उत्पादन बढ़कर मिले, तब अगली फसल में रासायनिक खाद और कम करिये, कुछ सालों में आपका रासायनिक खाद शून्य हो जायेगा.

लगातार रासायनिक खाद के इस्तेमाल के कारण मिटटी से उत्पन्न होनेवाले रोगों का प्रमाण बढ़ गया है, उससे निजात पाने के लिए कंपनी द्वारा बताये अनुसार खेत में बनाकर ट्राइकोडर्मा ट्रीटमेंट करें, ५ एकड़ ट्रीटमेंट का खर्च २५० रुपये आता है.

मल्टीप्लायर का इस्तेमाल करने के कारण फसल को बढ़ाने के लिए, पत्तों को गहरे हरे रंग का बनाने के लिए, दूसरे किसी उत्पादन की आवश्यकता नहीं पड़ती.

टमाटर में अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, रोग पूरी फसल को बर्बाद कर देते हैं, साथ साथ रस चूसनेवाले कीड़े भी कभी-कभी नियंत्रण में नहीं आते, ऐसी स्थिति में किसान पौधों को निकालने का निर्णय ले लेता हैं, मल्टीप्लायर के साथ खेती करनेवाले किसान भाइयों को यह समस्या आने की संभावना कम से कम होती है, क्योंकि, मल्टीप्लायर फसल को बलवान बनाता है इसलिए उस पर किटक तथा रोगों का अटेक कम होता है, अगर होता भी है, तब ऑल क्लियर रासायनिक दवाओं की प्रतिकारशक्ति कीटकों में नहीं आने देता, इसलिए १५ लीटर पानी में सिर्फ २ मिली ऑल क्लियर प्रत्येक छिड़काव में डालना जरुरी है. आपका दोस्त:-9767981244



शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

Kadhi Yetoy Aamcha Shetkari Divas

झाला झाडू दिवस झाला योगा दिवस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
पन्नास किलोची गोणी बघा उचलून डोक्यावर
तीन तीन हांडे पाणी आणून दाखवा डोक्यावर
शेतकऱ्याच्या सुखासाठी करा एकदा नवस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
पोटाची खळगी तुमची ठेवा जरा उपाशी
शिळी भाकर खा आमची नका खाऊ तुपाशी
आमच्या बापासारखा काढा एकतारी दिवसकधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस

नांगर धरून शेतात चालवून दाखवा दिवसभर
गळक्या पत्र्याच्या घरात राहून दाखवा रातभर
बिना लाईटची बघा आमची रोजची अमावस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस
विधवा झालेली शेतकरीण बघा तिचे हाल
शेतात राबणारी मोलकरीण घराविना बेहाल
तिचेही येउद्या साहेब एकदा सुगीचे दिवस
कधी येतोय साहेब आमचा शेतकरी दिवस

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...