शुक्रवार, ३० मार्च, २०१८

सेंद्रिय शेतीचे फायदे या मागील लेखात आपण सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे जाणून घेतले. या सदरात आपण सेंद्रिय शेती करण्यापूर्वीचे निकष, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, विविध योजना, सेंद्रिय शेती कार्यक्रम पद्धती याबरोबरच सेंद्रिय शेती प्रक्रियेतील आवश्यक गोष्टी इ .सर्व गोष्टीची माहिती जाणून घेऊया. त्यामध्ये मुख्यत सेंद्रिय शेती करण्याची गरज आपण मागील सदरात बघितले आता ह्या सदरात सेंद्रिय शेतीसाठीची मानके काय असतील? ते बघूया.

उपलब्ध नैसर्गिक साधने आणि तंत्राचा अवलंब :
शक्यतो गावरान बियाण्याचा वापर करावा कारण ते रोग व कीड प्रतिकारक असते तसेच ते कोणत्याही वातावरणात उत्तम वाढते. जर आपल्याकडे असे बियाणे उपलब्ध नसेल तर आपण आपल्या शेतीत पूर्वी तयार केलेले बियाणे वापरावे.

पिकाची फेरपालट करून जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण वाढून कीड व रोगाचे नियत्रण होते .

शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतीत उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ, हिरवळीची खते , गांडूळ खते , कंपोस्ट खत , खोल मुळे असणाऱ्या वनस्पती तसेच द्विदल पिकाची लागवड करणे जरुरी आहे.

पिक लागवडीच्या आधी नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा. उदा. गोमुत्र, राख, जीवाणू खत ई .

पिक संरक्षणासाठी निंबोळी अर्क, सापळा पिके, मित्र पिके, लसुन मिरची ताक मिश्रण, परोपकारी जीवजंतू व कीटकांचा वापर करावा.


शुक्रवार, १६ मार्च, २०१८

राज्याच्या कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी गटांसाठी स्वतंत्र योजना आखण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे.
गटपद्धतीने सेंद्रिय शेती कार्यक्रम
राज्याच्या सेंद्रिय शेती धोरणातून 2013-14 पासून सेंद्रिय शेतीबाबतचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान अंतर्गतसुद्धा गटपद्धतीने सेंद्रिय शेती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सेंद्रिय शेती योजना क्षेत्रीय स्तरावर प्रकल्पाधारित पद्धतीने राबविली जाते. प्रकल्प तयार करताना 10 किलोमीटर त्रिज्येच्या प्रकल्प क्षेत्रामध्ये 20 सेंद्रिय शेती (शेतकरी) उत्पादकांचा एक गट याप्रमाणे 10 गट तयार करावेत. प्रतिगट किमान 10 हेक्‍टर क्षेत्र असे प्रकल्पाचे 100 हेक्‍टर क्षेत्र असावे. अशा प्रकारे 100 हेक्‍टरचा एक प्रकल्प तयार करताना दुर्गम डोंगराळ भागात क्षेत्र परिस्थितीनुसार क्षेत्र निवडीमध्ये लवचिकता ठेवली जाते.

लाभार्थी निवड
लाभार्थी निवडताना लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना प्राधान्य. अनुसूचित जातीसाठी 15 टक्के व अनुसूचित जमातीसाठी 7.5 टक्के आरक्षण. एकूण खर्चाच्या 30 टक्के निधी महिला शेतकऱ्यांसाठी खर्च करण्याची तरतूद.
कार्यक्रम राबविताना यापूर्वी राबविलेल्या बाबी/घटकांसाठी अन्य योजनांमधून (विदर्भ पॅकेज, राष्ट्रीय जैविक खेती केंद्र, गाजियाबाद, नाबार्ड योजना इ.) लाभ घेतला नाही, याची तपासणी केली जाते.

मंगळवार, १३ मार्च, २०१८

सातारा ऑरगॅनिक उपक्रमाचा प्रारंभ
दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी सातारा जिल्हा परिषदेचा सातारा ऑनगॅनिक या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ मा.ना.श्री विजयराव शिवथरे,पालकमंत्री जिल्हा सातारा यांचे हस्ते व मा. श्री. नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा यांचे उपस्थितीत करणेत आला. अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी अधिक उत्पादन देणा-या व संकरीत जाती,रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके यांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येत आहे.त्याच्या वापरामुळे पीक उत्पादनात निश्चितच वाढ झाली,परंतू रासायनिक खते व कीटकनाशकांच्या सततच्या व अयोग्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे, पिकांची उत्पादकता कमी होणे व उत्पादित शेतमालाची प्रत खालावणे,मानव व पशूपक्षी यांच्या आरोग्यावर परिणाम होणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत.त्याच प्रमाणे पाण्याचे आणि वातावरणाचे प्रदूषणही मोठया प्रमाणावर होत आहे.हे लक्षात घेता,सेंद्रीय शेती ही केवळ शेती पध्दती न राहता जीनवशैली व्हावी यासाठी जिल्हयात सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन व सेंद्रीय शेतमाल विक्रीस सहायता करणेचा अभिनव उपक्रम सातारा ऑरगॅनिक या नावाने शेतक-यांच्या सहभागातून राबविण्यात येत आहे.
सातारा जिल्हयातील सेंद्रीय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी नोंदणी केलेल्या उत्पादक शेतक-यांकडील शेतमालाची विक्री जिल्हयातील महीला बचत गटांचे मार्फत करण्याचा मानस असुन सदर विक्री केंद्रासाठी पंचायत समिती सातारा येथिल डी.आर.डी.ए.कडील उभारण्यात आलेल्या दुकान गाळयामध्ये सेंद्रीय उत्पादक शेतक-यांचा शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून त्याची विक्री महीला बचत गटामार्फत करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत केलेला भाजीपाला,आले,हळद,काकडी,मुळा,कोथिंबीर,पेरू,सिताफळ,सेंद्रीय गुळ,काकवी,चवळी,गहू,ज्वारी,मोहरी,हरभरा डाळ,कांदा,घेवडा डाळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच सेंद्रीय पध्दतीने तयार केलेले आवळा ज्यूस,फेस पॅक,शाम्पू,साबण देखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
सातारा ऑरगॅनिक उपक्रमांतर्गत सातारा पंचायत समितीचे आवारात सुरू करण्यात आलेले सदरचे सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र आठवडयातून गुरूवार व रविवार या दोन दिवशी सुरू राहणार असून जिल्हयातील इतर ठीकाणी देखील अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्याचे नियोजित आहे.शेतक-यांच्या सहभागातून सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमास मा.ना.पालकमंत्री महोदय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.या उपक्रमाची माहीती सातारा जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ. www.satarazp.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उपक्रमा अंतर्गत सहभागी शेतक-यांचे शेतावर क्षेत्रीय भेट देणे,शेतक-यांना प्रशिक्षण देणे,सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी मदत करणे तसेच कृषि विद्यापीठामध्ये शेतक-यांचे सहलीचे आयोजन करणे इत्यादी उप्रकम देखील राबविण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री सोनवलकर, उपाध्यक्ष मा.श्री रवि साळुंखे, समाजकल्याण सभापती मा.श्री. माळवे, कृषि,पशूसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती मा.श्री शिवाजीराव शिंदे, सातारा पंचायत समितीच्या सभापती श्रीमती कविता चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री पी.बी.पाटील, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा मा.श्री थाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.श्री जितेंद्र शिंदे, प्रकल्प संचालक (आत्मा) मा.श्री गणेश घोरपडे, कृषि विकास अधिकारी मा.श्री चांगदेव बागल तसेच जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व सातारा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित होते

सोमवार, ५ मार्च, २०१८

३० वर्षापूर्वी, दिल्लीस्थित हे उच्च विद्याविभूषित दाम्पत्य, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून जंगलात ओर्गनिक शेती करू लागले, एक अद्भुत याशावी साहसकथा.


सारांश

आर्थिक स्थैर्याचे जीवन सोडून देवून, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शेतीची माहिती नसतानाही शेतीचे यशस्वी प्रयोग करणारे, ४० एकर ओसाड डोंगराळ जागेत आज भाज्या, कापूस, ई. ओर्गनिक पद्धतीने पिकवून विवेक आणि जुली करिअप्पा यांनी आपल्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. निसर्गाचा र्हास रोखण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करत



सविस्तर बातमी

३० वर्षापूर्वी, दिल्लीस्थित हे उच्च विद्याविभूषित दाम्पत्य, गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून जंगलात ओर्गनिक शेती करू लागले, एक अद्भुत याशावी साहसकथा.
तुम्ही उच्चविद्याविभूषित आहात, तुम्हाला आणि तुमच्या बायकोला दिल्लीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे, पदरी दोन गुणी मुलं आहेत, सगळ काही छान सुरु आहे....
एक दिवस जेवणाच्या टेबलावर तुम्हां कुटुंबियांमध्ये रासायनिक खते आणि पेस्टीसाईडस फवारलेल्या अन्नाविषयी चर्चा होते, हे असलं विष माणसाने का खायचं म्हणून तुम्ही आता ऑरगॅनिक फूड खायला लागता.
यातूनच समाजाचं देणे आपण दिलं पाहिजे म्हणून ते सुखासीन आयुष्य सोडता आणि कुटुंबियांसकट कष्टप्रद नैसर्गिक शेतीचं तुम्ही पूर्णपणे अनभीज्ञ असलेळे क्षेत्र एक आव्हानी करिअर म्हणून निवडता......
संपूर्ण कुटुंबियांच्या साथीने एक यशस्वी ऑरगॅनिक स्वयंपूर्ण शेतकरी म्हणून निव्वळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सुद्धा भारताचे नाव उज्वल करता.
सगळंच अदभूत...शब्दशः स्वप्नवत
फार्मर्स बाय चॉइस विवेकजुली करिअप्पा कुटुंबीय मंडळी
असं म्हणतात, की आपल्या आजूबाजूला बदल घडवून आणायचा असेल, तर तो आधी स्वतः मध्ये घडवून आणावा लागतो!
विवेक आणि जुली करिअप्पा या दाम्पत्याबद्दल बोलताना ही गोष्ट अत्यंत समर्पक वाटते.
३४ वर्षांपूर्वी, दिल्लीमध्ये उच्च शिक्षण घेवून अत्यंत चांगल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीत असलेले विवेक आणि जुली, निसर्गाच्या होणार्या र्हासामुळे अस्वस्थ होते.
आपल्या पुढच्या पिढीला आपण काय नैसर्गिक ठेवा ठेवू शकणार, याबद्दल चिंतीत होते. फक्त तुम्हां आम्हांसारखं फक्त चिंता करून ते शांत बसले नाहीत तर त्यांनी स्वतःच याबाबत काहीतरी प्रयत्न करायच ठरवलं आणि ते शेती किंवा लागवडीसाठी योग्य जागा शोधू लागले.
त्यांना मिळाली ती अत्यंत सुंदर पण नापीक आणि दगडांनी– काट्यांकुट्यानी भरलेली, मागे एक डोंगर असलेली, ४० एकर जमीन... आणि ती देखील शहरीकरणाचा मागमूस नसलेल्या कर्नाटक मधील हेग्ग्द्देवन्ना-कोटे या गावात. अगदी जवळ रेल्वेलाईन सुधा नाही, फक्त छोटीशी नदी वाहते, अगदी इतकी निसर्गाच्या जवळ.
विवेक आणि जुली यांनी सुरुवात केली ती त्या उजाड जमिनीवर एक छोटसं दगडी घर बांधून. पण, त्यांची हौस ‘फार्म- हाउस’ पुरती मर्यादित नव्हती, तर ते एक मोठ स्वप्न पहात होते ज्याची सुरुवात घराच्या आजूबाजूला हळू हळू झाडे लावायला सुरुवात करून झाली.
मोठा मुलगा कबीर सोबत शेतात काम करताना आई जुली करिअप्पा
शेतीचा, किंवा बागायातीचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना, हे स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी त्यांना अक्षरशः भगीरथ प्रयत्न करावे लागले. परंतु, आपल्याला काय करायचे आहे हे मनाशी ठाम असल्यावर, कष्टांच्या जोडीने अत्यंत अवघड असं त्याचं स्वप्नं या दोघांनी गेल्या तीन दशकांच्या अथक अभ्यासाने, मेहेनतीने सत्यात उतरवून दाखवलं आहे.
 
सुरुवातीला केवळ १४ एकर जमिनीमध्ये त्यांनी विविध पिकं घेण्यास सुरुवात केली. जमिनीच्या पोताप्रमाणे, निसर्गचक्राचा सखोल अभ्यास करून, त्यांनी त्यात हळूहळू बदल केले.
सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांनी सुरुवाती पासूनच रासायनिक खतांचा वापर करायचा नाही हे ठरवले होते, त्यानुसार नैसर्गिक खतांचा अभ्यास करून, त्यांचा वापर सुरु केला.
विवेकजी सांगतात, पंचगव्याचा वापर केल्यावर आमच्या शेतावर येणाऱ्या प्रत्येकाला इथे काहीतरी बदल झालाय याची जाणीव व्हायची. इथल्या हिरवेपणामध्ये देखील एक वैशिष्ट्य आलं, पिकांच्या चवीमध्येही फरक कळून येऊ लागला आणि एकूणच उत्पादनामध्ये वाढ झाली.
करिअप्पा कुटुंबीयांनी स्वयंपूर्ण शेतीसाठी फार्मवर जोपासलेले गोधन
विसाव्या शतकात ‘ओर्गनिक फूड’ ची संकल्पना भारतात रुजत होती तेंव्हा विवेक आणि जुली करिअप्पा यांचे प्रयोग आणि प्रयत्न यांचं स्वागत आणि कौतुक दोन्ही झालं!!
विवेक आणि जुली यांच्या ४० एकर शेतात आज जवळजवळ ३५ प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात आणि त्यातला मोठ हिस्सा कुर्गच्या नामांकित रीसोर्टना पुरवला जातो.
गाईचे शेणखत वापरून केलेल्या शेतीमाला सोबत विवेक करिअप्पा
करीअप्पा कुटुंबीयांनी जाणीव पूर्वक आपल्या शेतातील सर्व उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे ठरवले आहे पण ते प्रोसेस करून! फळांचा जाम, धान्यांची पीठे, ऑरगॅनिक गूळ पावडर, त्यांच्याच शेतातील कापसापासून बनवलेली खादीची वस्त्रोत्पादने या स्वरूपात.
त्यांच्याकडे तयार होणारे कापड लंडनस्थित ‘Just Clean Cotton’ या संकेतस्थळावर विक्रीला उपलब्ध आहे. हे वाटते तितके सोप्पे नाही.
ऑरगॅनिक शेती करून तयार केलेल्या धाग्या सोबत जुली करिअप्पा
पण त्यांच्या याच धोरणामुळे, हलसणूर तालुक्यातील किमान ५० कुटुंबे आर्थिकरित्या स्वावलंबी झाली. आज शहरातील नामांकित डीजायनर त्यांच्या कडील तयार कापडाचे विविध डीझाइनचे कपडे त्यांच्याच ब्रांडने बाजारात उपलब्ध करून देतात.
Just Clean Cotton ...करिअप्पा यांचा स्वतःचा ब्रांड
आज करिअप्पा यांचे एच.डी. कोट्टे येथील ‘क्रक -ए-दाव्ना’ (Krac-a-dawna) हे फार्म, आज अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. हे अनोखे नाव देखील त्यांच्या मुलाच्या फ्रेंच भाषा प्रेमातून जन्माला आले आहे.
विवेक आणि जुली करिअप्पा यांना त्यांच्या या कार्याबद्दल शासनाच्या ‘कृषी पंडित’ या सन्माननीय पुरस्काराने देखील गौरवले गेलं आहे.
पण, केवळ आपली शेती, त्यातून येणारे उत्पन्न आणि आपली कौटुंबिक प्रगती यापुरतेच विवेक आणि जुली करिअप्पा यांचे विश्व मर्यादित राहिले नाही. त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण भागात शेती करण सोपं नाही, त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध नाही. तसंच, ग्रामीण शैक्षणिक धोरणांचा भर मुलांनी शिकून शहराकडे जावे आणि तिथे नोकरी –उद्योग शोधावा असाच असतो.
करिअप्पा कुटुंबातली महिला फळी शेतात काम करताना
त्यांनी आपल्या कबीर आणि आझाद या दोन्ही मुलांना जाणीवपूर्वक नैसर्गिक शेतीच्या वातावरणातच वाढविले, इतकंच नव्हे तर जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर आपल्या शेतीमध्ये करता येईल याबाबत प्रशिक्षण घेण्यास त्यांनी या दोघांनाही उद्युक्त केलं.
आज, कबीर आणि आझाद दोघेही आपल्या आई-वडिलांनी सुरु केलेला हा प्रयत्न पुढे सुरु ठेवण्यात सहभागी झाले आहेत, इतकंच नव्हे तर कबीरची पत्नी अंजली हिला देखील शेतीची खूप आवड आहे.
जुली यांच्या मते, ओर्गनिक फूडचं प्रेम केवळ ते खरेदी करण्यापुरते न ठेवता, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी उद्युक्त करणे आणि आपले आपण देखील काही पिकवणे याकडे झुकले पाहिजे.
त्या म्हणतात, “Organic is not a product, it’s a process of self –awareness.”
‘क्रक-ए-दाव्ना’ ची प्रगती पाहून, अनेक शेतकऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन आणि शेती विषयक सल्ला देण्याची विनंती केली.
स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना करिअप्पा दांपत्य
यातूनच जन्म झाला सवैयव कृशीकारा संघाचा! [Savaiyava Krishikara Sagha (SKS)] आज १५० हून अधिक सभासद असलेल्या या संस्थेतर्फे इच्छुक शेतकऱ्यांना नैसर्गिक जैविक शेती बद्दल माहिती आणि मार्गदर्शन केले जाते.
प्रसंगी दगडाचे सूप पिवून देखील दिवस काढलेल्या पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अथक कष्ट घेवून काही प्रमाणाततरी निसर्गाचे रक्षण करण्यात यशस्वी ठरलेल्या विवेक- जुली करिअप्पा यांच्या व्यक्तिमत्वातच प्रेरणा ठासून भरलेली आहे.
करिअप्पा कुटुंबियांचा आदर्श आपण भारतीयांनी ठेवायलाच हवा....
अशा या प्रेरणादायी करिअप्पा कुटुंबाविषयी आणि ‘क्रक ए दाव्ना’ बद्दल टीम भारतीयन्स’ला विलक्षण आदर वाटतो आहे.

शनिवार, ३ मार्च, २०१८

सोयाबीन.

सोयाबीन की फसल का फसल का मल्टीप्लायर के साथ नियोजन.

बीजों की बुवाई करने से पहले बीजों को मल्टीप्लायर के साथ बीजोपचारित करें, बीजोपचार करने का तरीका अलग से बताया गया है.
फसल लगाते समय १ किलो मल्टीप्लायर देना है, उसके १ महीने बाद १ किलो मल्टीप्लायर देना है, देने की विधि अलग से बताई गई है.

छिड़काव से फसल पर ज्यादा अच्छा और तुरंत परिणाम मिलता है, इसलिए जमीन से देने के साथ-साथ प्रति सप्ताह १५ लीटर पानी में १५ ग्राम मल्टीप्लायर + २ मिली ऑल क्लियर मिलाकर छिड़काव करें, इसमें आवश्यकतानुसार रासायनिक दवाइयां भी मिलाई जा सकती हैं.

रासायनिक खाद एकदम से बंद नहीं करना है, उसका प्रमाण २० प्रतिसत कम करिये, जब आपको उत्पादन बढ़कर मिले, तब अगली फसल में रासायनिक खाद और कम करिये, बढ़ते उत्पादन के साथ रासायनिक खाद कम होते-होते कुछ सालों में आपका रासायनिक खाद शून्य हो जायेगा.

मल्टीप्लायर के इस्तेमाल से पत्तों का आकार बड़ा बनेगा, शाखाओं की संख्या ज्यादा मिलेगी, फसल की अच्छी ग्रोथ के लिए आपको अलग से खर्च नहीं करना पड़ेगा, सोयाबीन की फसल में कई बार अधिक बरसात से फसल का नुकसान हो जाता है, मल्टीप्लायर का छिड़काव होता रहनेवाली फसल का अधिक बरसात में भी नुकसान नहीं होगा या कम से कम होगा.

मल्टीप्लायर का इस्तेमाल होने से खर्च में बचत होती है तथा उत्पादन बढ़कर मिलता है.



शुक्रवार, २ मार्च, २०१८

*काय करतोय शेतकरी राजा?*
*कुठे चालली आहे वाट?*

पिकवतो तो पण त्याच्या पिकांवर जगणारे दुसरे.
जो खातो शेतकऱ्यांचे तो श्रीमंत,
जो पिकवतो तो मात्र गरीबच राहिलाय.
*का?* *कशामुळे?* *कधी विचार केलाय?*

ना कर्ज माफी लवकर मिळतीये ना कर्जावर सूट.
ते तर सोडा , जे अन्न धान्य कष्टाने घाम गाळून उगवतो, पिकवतो त्यावरही योग्य मोबदला नाही.

बाकी सर्व पुढे गेले, शेतकरी मात्र मागासलेला का? कोणामुळे कधी केलाय विचार, नाही केला.

मोठं मोठे प्रोजेक्ट, कंपन्या त्याच्या जमिनी घेऊन उभ्या केल्या जातात. त्याच्याच जमिनीवर, त्याची इच्छा नसताना.
आणि जरी जमिनी घेतल्या

*त्याबदल्यात शेतकऱ्याला मिळते काय?*

कोटीच्या जमिनीची किंमत लाखात मोजली जाते.
पुनर्वसन केले जाईल म्हणून सांगितले जाते, ज्या माती शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या गेल्या ती जमीन अशीच द्यावी लागते.

शेतकऱ्याने जमिनी दिल्यावर काम काय करायचे तर शहरात जाऊन नोकरी करा म्हंटले जाते,

म्हणजे आपल्या शेतात अगदी हुशारीने काम करणारा शेतकरी, शहरात जाऊन आडानी मानला जातो. दुसरा पर्याय हा दिला जातो की, ज्या कंपन्या यिथे उभ्या राहतील तिथे त्याला काम दिले जाईल,
आणि कंपन्या उभ्या राहिल्या की याला एकच काम दिले जाते, कंपनी गेट वर उभा राहण्याचे,

म्हणजे जो खरा त्या जमिनीचा मालक तो नोकर होतो. आणि जो त्यांच्या जमिनीवर कंपनी टाकतो तो मालक होतो. आणि या सर्वाला विरोध केला तर विकासामध्ये शेतकरी अडसर घालतात म्हंटले जाते.

आज पर्यंत ना कोणाला योग्य मोबदला मिळाला,ना पुनर्वसन झाले, भाक्रा- नांगल सारखे मोठे उदाहरण सर्वान समोर आहे.

*१६० कोटी रुपये औद्यागिक कंपन्यांचे टॅक्स माफ केले जातात,*
आणि

*१२० कोटी रुपये कर्ज माफी करायला यांना २-२ वर्षे लागतात.*

*देशाचा मुख्य व्यवसाय शेती हे मान्य करायचे तरी कसे?*

*कुठे तरी समजण्याची गरज आहे.*

*जो दुसऱ्यांना अन्न पुरवतो त्याने विकसित होण्याची गरज आहे.*

*आता काही तरी बदल घडविण्याची गरज आहे.*

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...